मूल जन्माला यावे म्हणून आई बाबाची असणारी गडबड,
ते जन्माला आल्या नंतर त्याला वाढवतानाची धडपड.🤗

ते मोठे झाले की त्याला सांभाळण्यासाठीची पळापळ,
किशोरवय म्हणजेच त्याचा अल्लडपणा जपण्याची धावपळ.🙄

मूल फक्त आपलंच ऐकावं यासाठी होणारी घालमेल,
लग्ना नंतर ते आपल्यापासून दूर जाणार म्हणून होणारी चलबिचल.😃

पालकांचं सगळं आयुष्य कसं मुलांभवती एकवटतं,
मुलं मोठी झाली की, मग ते आयुष्यच एकटं पडतं.😅

म्हणून वेळ न घालवता स्वतःला सावरूया, भावनांना आवरूया,
वेगवेगळे छंद जोपासूया आणि आनंदाने जीवन जगुया.🤗
– प्रेमा