हिरवागार निसर्ग आणि त्याची शुद्ध हवा,
असा अनुभव वेळ मिळेल तेंव्हा घ्यावा.
येथील हिरवळ पाहून मन प्रसन्न होते,
रंगी बेरंगी फुलांचे दर्शन मनाला उभारी देते.
अनमोल आहे निसर्गातील हा विविधतेचा ठेवा,
निसर्गाचे संवर्धन करणे तुझ्याच हाती रे मानवा.
प्राणी पक्षी आनंदाने बागडताना पाहून,
माणूस जाई या निसर्ग सौंदर्यात हरवून.
फक्त मानवासाठी नाही पृथ्वी ही सगळी,
जपली गेली पाहिजे निसर्गाची अन्न साखळी.
ओला व कोरडा दुष्काळ देऊन निसर्ग मानवास समजावी,
माणसाच्या चुकीची शिक्षा मुक्या जीवांनी का भोगावी?
निसर्ग कोपला म्हणत नको करू तू त्रागा,
निसर्ग नियम पाळण्यासाठी आता हो तू जागा.
– प्रेमा
October 11, 2021 at 4:40 pm
Wwwaahhh wwwaahhh… khooopach chhaann
October 11, 2021 at 4:43 pm
धन्यवाद दादा!🙏😊
October 11, 2021 at 5:16 pm
वाह. निसर्गाचे वरदान छान
आपणही नीसर्गाच्या संगोपनात देऊ योगदान.
मस्तच ग
October 11, 2021 at 5:17 pm
धन्यवाद ताई.🙏😊
October 12, 2021 at 1:41 pm
Bahut khub, man is the culprit here. Once the era of industrialization started man forgot he was a part of a system and began to behave as if he was the king of the system. He did not use the resources but abused them. मला तुझ्या कवितांचे विषय खूप आवडतात. आणि लिहिते तर तू उत्तमच!!!! God bless you.
October 18, 2021 at 1:22 pm
खूप खूप धन्यवाद ताई.🙏😊