त्याच त्या गोष्टी
तेच ते राजकारण
परत तेच सर्व,
टोळीच्या म्होरक्याने
परत आणलयं
चमचे लोकांचे पर्व.

या कुचकट लोकांचा हात
धरू शकणार नाही कोणी
कुटाळक्या करण्यात,
पहिला नंबर मारतील
कुठून तरी शोधून आणलेले
उसने तत्वज्ञान झाडण्यात.

समोर गोड बोलून
मागे काड्या करणे
अशा व्यक्तींचा धंदा,
माणुसकी सोडून
कोणताही थर गाठतील
मिळवण्यासाठी रुपया बंदा.

मी नाही त्यातली
कडी लावा आतली
असे या लोकांचे तत्व,
सोज्वळ असल्याचा
कितीही आव आणला तरी
लपत नाही असे व्यक्तिमत्त्व.

रडून पडुन सहानुभूती
मिळवून तुम्ही केलेले कर्म
जगापासून नाही लपणार,
तुमच्या घाणेरड्या राजकारणामुळे
सरळ लोकांना झालेल्या त्रासाचे
फळ तुम्हाला आयुष्यात नक्की मिळणार.

शेवटी सोबत येणार
तुमच्यातील माणुसकी
आणि प्रामाणिकपणा,
सज्जनहो पुढेपुढे करून
चार पैसे कमावण्यापेक्षा
जपा स्वतःतील सच्चेपणा.
– प्रेमा