मुलगी लहान असताना करतात सगळेच तिचे लाड;

ती मोठी झाली की म्हणतात तिला होऊ नको जाड.

घरच्यांनी वसा घेतला पाहिजे, हा शरीर सौंदर्याचा बाजार थांबवला पाहिजे;

कधीतरी समाजाला नमवलं पाहिजे, आता हे थांबवलं पाहिजे.

तिला लहानपणापासून जपतात एवढं जीवापाड;

तर मग लग्नाच्या बाजाराचं डोक्यात येतं कुठून फ्याड.

आता पालकांचे प्रबोधन केले पाहिजे, मुलींच्या बौध्दीकतेला महत्त्व दिले पाहिजे;

सौंदर्याची व्याख्या बदलवली पाहिजे, मुलांना ही अक्कल आली पाहिजे.

मग मुलगा मुलगी एक समान हे फक्त कागदावर राहणार नाही;

समाजात कोणत्याच बाबतीत मुलगा मुलगी हा भेद होणार नाही.

– प्रेमा