निवडणूक म्हटले की राजकारणी लोकांच्या
धावपळीचा काळ आणि मन खट्टू झाल्याने
त्या काळात सर्वसामान्यांना आठवते ते बटण नोटा.🙏
मतदानाच्या काळात आठवण येते म्हणून
मतदार राजाच्या पाया पडून निवडून येत
नेते मंडळी सगळीकडे मिरवतात घालून फेटा.🙏
एकदा निवडून आले की हे नेते लोकं
अजिबात ढुंकून न पाहता सर्वसामान्यांना
पुढील पाच वर्षांसाठी देतात हळूच फाटा.🙏
खूप कमी राजकारणी लोकं जनता जनार्धन
म्हणून प्रामाणिकपणे काम करून मिळवतात
सर्वसामान्य नागरिकांच्या प्रेमाचा भरपूर साठा.🙏
धकाधकीच्या जीवनात भरीस भर म्हणून
बेकारी, वाढती महागाई आणि शहर विद्रुपीकरण
पाहून सर्वसामान्यांच्या अंगावर येत आहे काटा.🙏
सगळीकडून त्रासाचा भडिमार सोसून
कंटाळली ही जनता, खरंच थांबाव्यात आता वाईट
राजकारण, दुष्काळ, युद्ध आणि कोरोनाच्या लाटा.🙏
सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या
राजकारण्यांना त्याची कीव न येता म्हणती आता
परत तुम्ही आम्हाला पुढील पाच वर्षांनी निवांत भेटा.🙏
सुजाण जनतेला एक विनंती आहे की, येत्या
निवडणूकीत करून या सगळ्यांना टाटा,
मतदानाच्या अधिकाराने लालची नेत्यांच्या माना छाटा.🙏
– प्रेमा
March 1, 2022 at 6:26 am
Aplya kade adich varshane review karun Sarkar ver no confidence motion anun sarkar barkhast karaycha adhikar hava.
March 1, 2022 at 11:06 am
आपल्याकडे खूप सारे कायदे आणि अधिकार आहेत पण त्यांची अंमबजावणी होताना दिसत नाही.
धन्यवाद!🙏😊
March 1, 2022 at 6:30 am
बरोबर लीहीलय. सध्याच्या राजकारणावर व नेत्यांवर नीवडणूक भाष्य. एकदा मतदान झालं की हे लोक बघतही नाही आपल्याकडे. मग मदत ,विकास तर लांबच राहीला. सर्वसामान्य भरडले जातात पण
March 1, 2022 at 11:06 am
हो ना.
धन्यवाद!🙏😊
March 1, 2022 at 6:33 am
वाहहहह … खूपच सुंदर.. सर्वांच्या मनातल्या भावनाच माडल्यायस 👍👍
March 1, 2022 at 11:07 am
धन्यवाद दादा.🙏😊